बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन महत्त्वपूर्ण घटनांची आठवण करून देतो. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो.
तथागत गौतम बुद्ध यांनी मानवजातीला शांती, अहिंसा, सत्य, करुणा आणि समतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देतात. त्यांनी सांगितले की, “मनुष्य आपल्या कर्माने महान बनतो, जन्माने नाही.”
या दिवशी बौद्ध बांधव विहारात जाऊन बुद्ध वंदना करतात, धम्मग्रंथांचे वाचन करतात आणि समाजात प्रेम, बंधुता व मानवतेचा संदेश देतात. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे, अन्नदान, आणि सामाजिक उपक्रमही आयोजित केले जातात.
बुद्ध पौर्णिमा आपल्याला शिकवते की राग, द्वेष आणि हिंसा सोडून प्रेम, दया आणि सत्याचा मार्ग स्वीकारावा. हा सण केवळ धार्मिक नसून, मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणारा आहे.
संदेश:
“बुद्धांचे विचार आचरणात आणा, जीवनात शांतता आणि यश नक्की मिळवा.”
शुभेच्छुक :-
आयु. रवींद्र उर्फ बबलू भाऊ मेश्राम
जिल्हाध्यक्ष, भीम आर्मी, यवतमाळ जिल्हा






